मुख्य सामग्रीवर वगळा

प्रभु श्रीरामांशी संबंधित दुर्लक्षित स्थाने

आपण रामायण लहानपणापासून ऐकत आलो आहोत परंतु रामायणातील बरीचशी ठिकाणे आपण ऐकलेली तर असतात परंतु पाहिलेली नसतात. आज रामनवमीच्या निमित्ताने या दुर्लक्षित ठिकाणांची चित्ररूपी सफर करूया...!!

  • गंधमादन पर्वत - तिबेट मधील हिमालय पर्वत रांगेत गंधमादन पर्वत आहे. इथे हनुमान आज ही निवास करतात अस मानल जात. इथूनच रावणाशी युद्धाची तयारी केली असल्याच म्हटलं जात. आणि भीमाच गर्वहरण ही याच पर्वतावर झाल होत. या पर्वतावर एक मंदिर आहे जिथे प्रभू श्रीराम यांच्या पावलांचे ठसे आहेत.त्याचप्रमाणे रामेश्वर मध्ये हि एक गंधमादन पर्वत आहे जिथून हनुमानाने लंकेत जाण्यासाठी उड्डाण केलेलं.


  • किष्किंधा, कर्नाटक - हम्पी पासून जवळच आसपास वसलेल्या भागात सुग्रीवच राज्य होत. पूर्वीच्या काळात दंडकारण्यात हा भाग यायचा. येथे वानरराज वाली व सुग्रीव यांची राजधानी होती. कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीकाठच्या हंपीजवळचे आधुनिक अनेगुंदी गाव म्हणजेच प्राचीन काळची किष्किंधा नगरी असे म्हणतात. अनेगुंदीपासून थोड्या अंतरावर आग्नेयीकडे तुंगभद्रेच्या काठी वालीप्रासाद व सप्ततालवेधस्थान दाखविले जाते. या स्थळापलीकडील गुंफेमध्ये रामाने वालीवधानंतर विश्रांती घेतली होती. नदीच्या पलीकडील तीरावर वालीवधाचे स्थान असून, तेथील श्वेतशिला वालीच्या अस्थी म्हणून दाखवितात, तर त्याजवळच्या पर्वत शिखरांना तारा, अंगद व सुग्रीव यांच्या नावांनी संबोधतात.


  • कोथंड रामास्वामी मंदिर, रामेश्वरम - अस म्हटलं जात कि रावणाला हरवल्यावर प्रभू श्रीमांनी बिभीषणाचा राज्याभिषेक इथेच केलेला. बिभीशनाचे भारतातील एकमेव मंदिर इथेच आहे. ज्या दगडांनी रामसेतू बनवला गेला त्याच दगडाने निर्मित एक शिवलिंग शेजारीच आहे जे पूर्णत समुद्रात आहे आणि जे कधीच पाण्याखाली बुडत नाही.


  • दिविरुम्पोला, श्रीलंका - सीतामातेने ज्या ठिकाणी अग्नीप्रवेश केला, त्या स्थानावरील अश्‍वत्थ वृक्ष आणि मंदिर. श्रीलंकेतील मध्य प्रांतातील अतीउंच पर्वतीय भागात हे स्थान आहे.


  • गुरुलूपोथा, श्रीलंका - येथे रावणाची पत्नी मंदोदरी हिच्या महालाच्या अवशेषांची छायाचित्रे ! सीतामातेचे रावणाने अपहरण करून तिला याच महालात ठेवले होते.


  • अशोक वाटिका, श्रीलंका - ‘सीतामातेच्या शोधात आलेल्या रामभक्त हनुमानाने या दगडावरून ज्या अशोक वृक्षाखाली सीतामाता बसली होती, त्या वृक्षावर झेप घेतली’, असे म्हणतात. दगडावर त्याचे पाऊल उमटले आहे.


  • शरयू नदी, अयोध्या - प्रभु श्रीराम आणि त्यांच्या प्रजेने अयोध्येतील याच शरयू नदीत जलसमाधी घेतली होती.


  • अयोध्या - भारताचा राजा, रावणाचा नाश करून श्रीलंका जिंकणाऱ्या अवतारी प्रभु श्रीराम यांच्या अयोध्येतील सध्याच्या स्थानाची स्थिती


संदर्भ :
  • सनातन संस्था
  • दैनिक भास्कर
  • विकिपीडिया

टिप्पण्या

  1. एक छान सफर घडवलीत 👍

    अयोध्येत लवकरच एक भव्य मंदिर अस्तित्वात येतेय , ते झाल्यावर शेवटचा डोळ्यात खुपणारा फोटो तुम्ही बदलालच :)

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या कडे ज्ञान भांडार प्रचंड आहे. तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  3. माहित नसलेली माहिती सर्वांना उपलब्ध करून दिली... 👍👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज

दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा. त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा... रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...?? तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..." निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते.... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल... आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खा...