मुख्य सामग्रीवर वगळा

सिंध मधील शेवटचा हिंदु राजा - राजा दाहीर

भारतात अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. आपल्याला सातत्याने त्यांच्याबद्दल ग्रंथ, पुस्तके आणि चित्रपटांमधून माहिती मिळतच असते. परंतु आठव्या शतकात एक असा पराक्रमी राजा होऊन गेला ज्याने मोहम्मद बिन कासीम ला तीन युद्धात हरवले आणि कित्येक वर्ष भारतात येण्यापासून रोखून धरले. परंतु या महापराक्रमी राजाची आपण भारतीयांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. आपल्या शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात एक ओळ ही या राजाच्या नशिबी आली नाही.

राजा चाच यांचे साम्राज्य

सहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. या आधी हि त्याने ३ वेळा आक्रमण करून पराभवाची चव चाखली होती. मात्र यावेळी आक्रमण करताना त्याने सोबतीला अनेक छोटे मोठे कबिले आणि बौध्द राजे घेतले होते. त्यामुळे त्याचे सैन्यबळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते.

राजा दाहीर

साल होते इ.स. ७१२. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या कुटुंबीयांना राजस्थामधील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अरबांशी लढत असल्यामुळे राजस्थानला, गुजरातला संरक्षण मिळत आहे, ते निश्चित मदत करतील.'' पण राजाने नकार दिला. तो म्हणाला, ''मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवले, तर माझ्या सरदारांना कोणत्या तोंडाने लढण्यास सांगू? या युध्दात जर मी जिंकलो, तर आपले राज्य महासत्ता होईल! आणि जर हरलो तर शौर्याने लढलो म्हणून माझे नाव अरब व हिंदच्या गाथांमधून अमर होईल!''

सिंधू नदीच्या काठी दाहीर व कासीमचे घनघोर युध्द झाले. राजा दाहीर व त्याचा पुत्र जयसिंह धारातीर्थी पडले. कासीमने राजाचे धडावेगळे केलेले शीर व त्याच्या मुली - सूर्यादेवी व प्रेमलदेवी "नजराणा" म्हणून खलिफाला पाठवल्या.

राजा दाहिरच्या मुलींनी युक्तीने कासिमवर सूड उगवला. त्यांनी खलीफास सांगितले की "कासीमने त्यांचा उपभोग घेतला असल्याने त्या खलिफासाठी लायक नाहीत!" या वक्तव्याने संतापलेल्या खलिफाने कासिमला मृत्युदंड ठोठावला. कासीमच्या मृत्युनंतर खलिफाला त्याची चूक लक्षात आली. तेव्हा त्याने राजा दाहिरच्या दोन बहाद्दर मुलींना भिंतीत चिणून मारले.

राजा दाहीर व त्याच्या पुत्राच्या शौर्याच्या व त्याच्या मुलींनी घेतलेल्या सुडाची कथा अरबांनी लिहिलेल्या 'चाचनामा'मध्ये आहे. पण हिंदच्या एकाही लेखात, गाथेत किंवा पोवाडयातसुध्दा त्यांचे नाव नाही. त्या राजाने, त्याच्या कुटुंबाने आणि त्याच्या हजारो सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची हिंदुस्तानात ही कोणीही दखल घेतली नाही.

मोहम्मद बिन कासीम ने राजा दाहीरच्या कुटुंबाला मारलं पण राजा दाहीरने संरक्षण दिलेल्या मोहम्मद पैगंबरांच्या परिवारातील लोकांची ही हत्या केली. परंतु दुर्दैव अस आहे कि धर्माधर्मात वाद लावणारे काही मुल्ला मौलवी पैगंबरांच्या वंशजांचे रक्षण करणाऱ्या राजा दाहीरच्या वंशजांना काफिर म्हणून संबोधत आहेत. आणि मोहम्मद पैगंबरांच्या परिवाराची निर्घुण हत्या करणारा मोहम्मद बिन कासीम त्यांच्यासाठी मसीहा आहे.

आता प्रश्न आहे माझ्या भारतातील मुस्लीम बांधवांना आहे, कि तुमचा हिरो कोण आहे? मोहम्मद बिन कासीम का राजा दाहीर??

संदर्भ - 


  • साप्ताहिक विवेक
  • पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
  • worldhistorymaps.info


टिप्पण्या

  1. आपल्या पुर्वजानी राज्य विस्तार करताना क्रूर व्हायला पाहिजे होतं आपल्या लोकांना झालेला त्रास वाचु, ऐकू वाटत नाही

    उत्तर द्याहटवा
  2. वाचताना हताश व्हायला होते, आपला चांगुलपणाच आपल्या नाशाला कारणीभूत झालाय हेच या सर्व इतिहासातून प्रतिबिंबित होतं.
    राजा दाहिर आणि त्याच्या कुटूंबियांना आपल्या इतिहासातील त्यांचे योग्य स्थान मिळायलाच हवे 🙏
    तुम्हाला धन्यवाद या लेखाबद्दल 👍🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खाद्य तेलांच्या किंमती का वाढत आहेत?

गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल .. पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत. परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत. याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~ जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील. यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे. Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील. किंमती का वाढल्या? आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो. पाम तेल - जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो. मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्य

अघोरी साधु आणि नागा साधु

कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा... परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक... अघोरी साधू  अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो. तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात. शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे

साठमारी डागदारी

नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे?? तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे... पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी .. अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या  साठमारी डागदारी  चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी  साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती. या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्यापैकी प्रत्येक माणसास ‘ साठमार