मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विद्यापीठ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विक्रमशीला विद्यापीठ

विक्रमशीला विद्यापीठाची स्थापना ८ व्या शतकात पाल साम्राज्याने केली. आज विक्रमशीला विद्यापीठाबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे आणि बऱ्याच लोकांना तर माहिती ही नाही की या नावाचे जागतिक किर्तीचे विद्यापीठ आपल्या भारतात होऊन गेले. नालंदा विद्यापीठाप्रमाणे येथे ही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असतं. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्याने विक्रमशीला विहाराची स्थापना केली. या विहाराची पुढे प्रसिद्धी ‘विक्रमशीला विद्यापीठा’त परिणती झाली. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव "विक्रमशीला" ठेवण्यात आले. पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने १९६० ते ६९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अँटिकच येथे उत्खनन केले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. सुमारे १०० एकर परिसरात सापडलेले भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात. विक्रमशील...

तक्षशिला विद्यापीठ

प्राचीन काळापासून भारतात पुष्कळ मोठी विद्यापीठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशिला, नालंदा,  विक्रमशिला, काशी, अयोध्या ही विद्यापीठे प्रसिद्ध होती. यांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे कालक्रमानुसार हे सर्वांत प्राचीन विद्यापीठ आहे. तक्षशिला या शहराचा पहिला उल्लेख आढळतो तो वाल्मिकी रामायणात... प्रभु श्रीरामांचे लहान बंधू म्हणजे राजा भरत यांना दोन पुत्र होते. एकाचे नाव तक्ष आणि दुसऱ्याचे नाव पुष्कल. राजा तक्षचे राज्य आताचे उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या मध्ये पसरले होते. त्यांनी "तक्षशिला" आणि "पुष्करावती" नावाने स्वतःच्या राजधान्या वसवल्या. उझबेकिस्तानची राजधानी असणारे "ताश्कंद" हे शहर "तक्ष" या नावाचा अपभ्रंश होऊन तयार झाले आहे. तक्षशिला शहर तत्कालीन भारतातील "गांधार” देशाची राजधानी होती. सध्याच्या पाकमधील रावळपिंडी शहरापासून पश्चिमेला २० मैलावर वसले होते.  "त्रिपिटक" या बौद्ध धर्माच्या प्रमुख ग्रंथात ही तक्षशिला विश्वविद्यालयाबाबत अनेक उल्लेख आढळतात. अगदी चीन, सीरिया सह ग्रीस मधील ही राजपुत्र येथे शिक्षणासाठी येत असत...

नालंदा विश्वविद्यालय

"नालंदा" हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किमी अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव "नलविहार" असे होते. नालंदाच्या सुमारे ३५ एकर क्षेत्रात दहा मंदिरे, विविध प्रकारचे बाग बगीचे, वसतिगृह आणि ग्रंथालय होते. नालंदाच्या ग्रंथालयाच्या नाव होते "धर्ममायायोग". धर्ममायायोगमध्ये अनेक इमारती होत्या. त्यातील काही इमारती तर ९ मजल्यापर्यंत उंच होत्या अस म्हटलं जात. या धर्ममायायोगमध्ये शास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, कला, वाणिज्य, भाषा यावर सुमारे ९० लाख ग्रंथ पुस्तके असल्याचा अंदाज आहे. नालंदा मध्ये शिक्षण मोफत होत. या विश्वविद्यालयाचा सर्व खर्च सम्राट हर्षवर्धनने दान दिलेल्या शंभर खेड्यांच्या माध्यमातून भागवला जाई. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू...