मुख्य सामग्रीवर वगळा

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत....

त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला.

त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले.

घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे विविध डावपेच शिकून उत्तम सराव होऊन सैनिकांना लढाईत उपयोग होई.


बोथाटीचा वार करण्याची व तो अडविण्याची क्रिया

बोथाटी या खेळाबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध नाही. जिथे जिथे या खेळाचे वर्णन आहे त्याच्या आधारे बोथाटीची लांबी ही सामान्यतः भाल्याच्या लांबी एवढीच म्हणजे साडे नऊ फुटांच्या आसपास असावी. तत्कालीन लेखनाच्या आधारे साडे तीन फुट अंतरावर बोथाटी-चेंडू लावत असावेत. त्याला रंग लावल्यास प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर खूण राहते. त्याकाळी चेंडूच्या खाली शोभा यावी म्हणून दोन लोंबत्या पट्ट्याही सोडलेल्या असत. अशा काहीशा नियमांसह त्यावेळी बोथाटीचा खेळ खेळला जात असावा.

सराव व करमणूक अशा दोन्ही गोष्टी बोथाटीपासून साधता येत असत. मात्र बंदूक आणि तोफगोळ्यांच्या वापरास सुरुवात झाल्याने घोडेस्वारांचे आणि भाल्यांचे महत्व कमी झाले. आणि मराठेशाहीच्या अस्तानंतर हा खेळही लुप्त झाला. आता ही गावाकडील अनेक जत्रांमध्ये आणि मर्दानी खेळांच्या शिबिरांमध्ये या खेळाची छोट्या स्वरूपातील प्रात्याक्षिके आपल्याला पाहायला मिळतात.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खाद्य तेलांच्या किंमती का वाढत आहेत?

गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल .. पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत. परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत. याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~ जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील. यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे. Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील. किंमती का वाढल्या? आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो. पाम तेल - जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो. मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्य

अघोरी साधु आणि नागा साधु

कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा... परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक... अघोरी साधू  अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो. तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात. शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे

साठमारी डागदारी

नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे?? तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे... पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी .. अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या  साठमारी डागदारी  चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी  साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती. या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्यापैकी प्रत्येक माणसास ‘ साठमार