मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंध मधील शेवटचा हिंदु राजा - राजा दाहीर

भारतात अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. आपल्याला सातत्याने त्यांच्याबद्दल ग्रंथ, पुस्तके आणि चित्रपटांमधून माहिती मिळतच असते. परंतु आठव्या शतकात एक असा पराक्रमी राजा होऊन गेला ज्याने मोहम्मद बिन कासीम ला तीन युद्धात हरवले आणि कित्येक वर्ष भारतात येण्यापासून रोखून धरले. परंतु या महापराक्रमी राजाची आपण भारतीयांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. आपल्या शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात एक ओळ ही या राजाच्या नशिबी आली नाही. राजा चाच यांचे साम्राज्य सहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. या आधी हि त्याने ३ वेळा आक्रमण करून पराभवाची चव चाखली होती. मात्र यावेळी आक्रमण करताना त्याने सोबतीला अनेक छोटे मोठे कबिले आणि बौध्द राजे घेतले होते. त्यामुळे त्याचे सैन्यबळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. राजा दाहीर साल होते इ.स. ७१२. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या कुटुंबीयांना राजस्थामधील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अर

आद्य शंकराचार्य - हिंदु धर्माचे पुनर्रचनाकार

७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले होते. त्यांना त्यावेळी राजाश्रय ही प्रचंड होता. आणि काळाच्या ओघात आक्रमकांशी लढता लढता हिंदु राजे अतिशय अल्प प्रमाणात राहिले होते. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात झालेल्या आपसातील लढायांमध्ये हिंदु धर्माला पायदळी तुडवण्याचे अनेक प्रयत्न इतर धर्मीय राजांकडून झाले. त्या जोडीला देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरीत होतेच. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला आणि तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. खरा हिंदु धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते. पण म्हणतात ना होणारा प्रत्येक सूर्यास्त त्याच्यासोबत एक नवा सूर्योदय घेऊन येतो. अशा अंधकार माजलेल्या परिस्थितीत आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळ (मलबार) प्रांतात पूर्णानदीच्या काठी, कालडी ग्रामी इ.स. ७८८ मध्ये एका नंबुद्री ब्राम्हणाच्या कुळात झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना आर्यांबा या त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगु

अघोरी साधु आणि नागा साधु

कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा... परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक... अघोरी साधू  अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो. तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात. शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे

टायटॅनिक आणि हिंदु मानसिकता

टायटॅनिक त्याकाळचे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे जहाज... कधीच बुडणार नाही अशी ज्याची जाहिरात झाली ते जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले. तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. त्यापैकी एक होते "सॅम्पसन" जे टायटॅनिकपासून ७ मैल दूर होते. त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले पण ते बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले. हे जहाज आपल्यापैकी त्या "स्वार्थी हिंदूंचं" प्रतिनिधित्व करतात जे हिंदू आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आपला भारत देश बुडत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!  दुसरे जहाज "कॅलिफोर्निया" होते. जे टायटॅनिकपासून फक्त १४ मैलांवरच होते, पण चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले. त्याच्या कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या. परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व क्र

अंत्यसंस्काराचे प्रकार

आयुष्याचा अखेरचा टप्पा म्हणजे मृत्यू... पण मृत्यू जरी सारखा असला तरी मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचे निरनिराळे प्रकार आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीत पाहायला मिळतात. मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराच्या पूर्व तयारीपासून मृत देहाच्या विल्हेवाटीचे मुख्यतः सहा प्रकार प्रसिद्ध आहेत. १) मृतदेहास अग्नी देण्याची प्रथा - अगदी प्राचीन काळापासूनच ग्रीक व रोमन समाजात मृतदेहाला अग्नी देण्याची प्रथा होती. हिंदू व बौध्द यांच्यात दहनाची प्रथा आजपर्यंत चालू आहे. दहन झाल्यानंतर ज्या अस्थी राहतात, त्यांना विधिपूर्वक पुरतात किंवा पवित्र नदीत त्यांचे विसर्जन केले जाते. २) मृतदेह जसाच्या तसा टिकविणे - वाळवंटी प्रदेशातल्या जमाती कोरड्या वाळूत खड्डा खणून मृत देहाला ठेवीत. अशा वातावरणात मृतदेह बराच काळ टिकतो. प्राचीन काळी इजिप्तमध्ये राजे व राण्या यांच्या मृतदेहांना टिकवण्याकरिता विशिष्ट प्रकारचे लेप लावून "ममी" तयार करीत असत. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांच्या प्रिय वस्तू, हत्यारे, अलंकार व त्यांचा मनुष्यपरिवारही पुरत असत.  ३) मृतदेह व्यवस्थित पुरणे - मृतदेहास स्

10 good habits that world should learn from INDIA

Here are 10 good habits that world should learn from INDIA to avoid epidemics like Corona. 1) Say YES to Namaste & NO to shake hands. Reason - As study shows viruses like bacterias can be transferred from one to another by shaking hands. Namaste is safest way to greet people. 2) Drinking water from bottles without allowing lips to touch the mouth of bottle. Reason - It reduces probability of transmission of inectious agents through saliva. 3) Practise of taking shower after attending the funeral. Reason - The dead oerson may have some infectious disease which can be transmitted so it makes sense. 4) Washing hands before eating. Reason - Your hands are touching everywhere so bacterias on your hands may cause you illness. Washing your hands before eating can rinse away most of the bacteria. 5) Removing shoes outside the main gate of house. Reason - Shoes have large number of bacteria on bottom of the shoes. So it makes sense

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज

दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा. त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा... रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...?? तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..." निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते.... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल... आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खा

प्रभु श्रीरामांशी संबंधित दुर्लक्षित स्थाने

आपण रामायण लहानपणापासून ऐकत आलो आहोत परंतु रामायणातील बरीचशी ठिकाणे आपण ऐकलेली तर असतात परंतु पाहिलेली नसतात. आज रामनवमीच्या निमित्ताने या दुर्लक्षित ठिकाणांची चित्ररूपी सफर करूया...!! गंधमादन पर्वत - तिबेट मधील हिमालय पर्वत रांगेत गंधमादन पर्वत आहे. इथे हनुमान आज ही निवास करतात अस मानल जात. इथूनच रावणाशी युद्धाची तयारी केली असल्याच म्हटलं जात. आणि भीमाच गर्वहरण ही याच पर्वतावर झाल होत. या पर्वतावर एक मंदिर आहे जिथे प्रभू श्रीराम यांच्या पावलांचे ठसे आहेत.त्याचप्रमाणे रामेश्वर मध्ये हि एक गंधमादन पर्वत आहे जिथून हनुमानाने लंकेत जाण्यासाठी उड्डाण केलेलं. किष्किंधा, कर्नाटक - हम्पी पासून जवळच आसपास वसलेल्या भागात सुग्रीवच राज्य होत. पूर्वीच्या काळात दंडकारण्यात हा भाग यायचा. येथे वानरराज वाली व सुग्रीव यांची राजधानी होती. कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीकाठच्या हंपीजवळचे आधुनिक अनेगुंदी गाव म्हणजेच प्राचीन काळची किष्किंधा नगरी असे म्हणतात. अनेगुंदीपासून थोड्या अंतरावर आग्नेयीकडे तुंगभद्रेच्या काठी वालीप्रासाद व सप्ततालवेधस्थान दाखविले जाते. या स्थळापलीकडील गुंफेमध्ये रामा

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण