मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

खाद्य तेलांच्या किंमती का वाढत आहेत?

अलीकडील पोस्ट

छत्रपती शिवराय आणि धर्मांध पोर्तुगीज ख्रिश्चन

ज्यांना वाटत छत्रपती शिवराय "सेक्युलर" होते हे त्यांच्यासाठी...!! महाराज इतर धर्मांचा आदर करत असले तरी हिंदु धर्माचा अनादर त्यांनी कधीच सहन केला नाही. तर गोष्ट आहे १६६३ मधली... तळकोकणात पोर्तुगीजांची मस्ती वाढली होती. स्थानिक हिंदुंचे धर्मांतर करुन त्यांना बाटवण्यात येत होते. हे सर्व समजताच छत्रपती शिवरायांनी तत्काळ तेथील फ्रान्सिस्को तोवेरा याला पत्र लिहून जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. स्वत: महाराज व तान्हाजीराव मालुसरे हे ३००० सैन्यानिशी तिथे बारीक लक्ष ठेवून होते. एका रात्री सुमारे ५०० पोर्तुगीज व ४ पाद्री हे हातामधे क्रॉस घेवून धर्मांतर करण्यासाठी मांडवी नदी पार करुन एका वस्तीच्या दिशेने जाताना आढळले. हे पाहताच महाराजांनी ताबडतोब त्यांच्यावर हल्ला केला. ३००० मराठ्यांनी मिळून त्यांना छाटायला सुरवात केली. २००-२५० पोर्तुगीज ठार झाले. हातात क्रॉस घेवुन चालणाऱ्या त्या चारही पाद्रींचे हात दंडापासून तोडले. मराठ्यांचा हा रुद्रावतार पाहून सगळे पोर्तुगीज वाट मिळेल तिथे पळत सुटले. अर्ध्याहून अधिक पोर्तुगीज सैन्याच्या मृतदेहांचा खच तिथे पडला. हात तोडलेल्या त्या लोक

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत.

साठमारी डागदारी

नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे?? तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे... पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी .. अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या  साठमारी डागदारी  चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी  साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती. या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्यापैकी प्रत्येक माणसास ‘ साठमार

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व

सनातन धर्माला नवसंजीवनी देणारा - पुष्यमित्र शुंग

     प्राचीन भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे कि, प्रत्येक कालखंडात आपल्याला अनेक शूरवीर योद्धे पाहावयास मिळतात. अनेक शूरवीर काळाच्या ओघात विस्मृतीतही गेले. त्यातीलच एक म्हणजे शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती पुष्यमित्र शुंग ....       मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु . १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. तत्पूर्वी आचार्य चाणक्य यांच्या निधनानंतर अखंड हिदुस्तानाची त्यांची कल्पना क्षीण झाली होती. चंद्रगुप्त मौर्याने ही जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार गादीवर येताच त्याने राज्याच्या सीमा दक्षिणेपर्यंत वाढवल्या. या पराक्रमी राजाच्या काळात मौर्य साम्राज्याने अनेक राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर गादीवर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक आला. पराक्रमी असणाऱ्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सुमारे २० वर्ष सम्राट अशोकाने राज्य केले.       ज्या भारतभूमीत जग जिंकायला निघालेला ग्रीकचा अलेक्झांडर ही पराभूत झाला तिथले शूरवीर मौर्य साम्राज्याच्या पराकोटीच्या अहिंसेमुळे लढण्याची क्षमताच गमावून बसले होते. यामुळे मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यं

सिंध मधील शेवटचा हिंदु राजा - राजा दाहीर

भारतात अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. आपल्याला सातत्याने त्यांच्याबद्दल ग्रंथ, पुस्तके आणि चित्रपटांमधून माहिती मिळतच असते. परंतु आठव्या शतकात एक असा पराक्रमी राजा होऊन गेला ज्याने मोहम्मद बिन कासीम ला तीन युद्धात हरवले आणि कित्येक वर्ष भारतात येण्यापासून रोखून धरले. परंतु या महापराक्रमी राजाची आपण भारतीयांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. आपल्या शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात एक ओळ ही या राजाच्या नशिबी आली नाही. राजा चाच यांचे साम्राज्य सहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. या आधी हि त्याने ३ वेळा आक्रमण करून पराभवाची चव चाखली होती. मात्र यावेळी आक्रमण करताना त्याने सोबतीला अनेक छोटे मोठे कबिले आणि बौध्द राजे घेतले होते. त्यामुळे त्याचे सैन्यबळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. राजा दाहीर साल होते इ.स. ७१२. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या कुटुंबीयांना राजस्थामधील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अर