हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!!
सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला.
ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात.
"किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या
समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात.
दक्षिण कोरियातील अनेक लोक स्वत:ला राणी सुरीरत्नाचे वंशज मानतात. सुमारे ६० लाख करक वंशीय आजही दक्षिण कोरिया मध्ये राहतात. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती Kim Dae-Jung आणि माजी प्रधानमंत्री KimJong-Pil हे सुद्धा स्वताला करक वंशीय मानतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोरियन नागरिक अयोध्येस भेट देतात आणि आपल्या २००० वर्षापूर्वीच्या राजमातेच स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात.
प्राचीन काळी दक्षिण आशियात भारतीय संस्कृतीचा खूप प्रभाव होता. इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया, थायलंड, नेपाळ या सारख्या अनेक देशात आजही प्रभू श्रीराम पुजले जातात. बऱ्याच देशात आता हिंदू अल्पसंख्यांक असले तरी ते देश हिंदुत्वाशी असलेली नाळ जोडून आहेत. त्यांची राष्ट्रीय प्रतिक, स्मारक यामधून आपल्याला ते सातत्याने दिसून येत.
मात्र जिथे दक्षिण आशियातून विविध देशाचे लोक आवर्जून भेटायला येतात त्या अयोध्येत प्रभू श्री रामांच साध मंदिर ही नाही. आजही प्रभू श्री राम एका तंबूत विराजमान आहेत हे निश्चितच भूषणावह नाही. अशा परिस्थितीत प्रभू श्रीरामांना पाहिल्यावर जे परदेशी नागरिक अयोध्येस भेट देण्यास येतात त्यांच्या मनात भारताबद्दल काय प्रतिमा तयार होत असेल? कोर्टाच्या आदेशानुषर अयोध्येत आता राम मंदिर निर्माण होणार असल तरी त्याबरोबरच अयोध्येस धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास दक्षिण आशियातील देशांसोबत सौदार्हपूर्ण संबंध वाढवण्यास ते निश्चितच पूरक ठरेल आणि भारत-दक्षिण कोरियाच्या नात्यात एक नवा अध्याय जोडला जाईल.
संदर्भ :
सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला.
"किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या
समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात.
![]() |
| राणी सुरीरत्ना यांची समाधी |
दक्षिण कोरियातील अनेक लोक स्वत:ला राणी सुरीरत्नाचे वंशज मानतात. सुमारे ६० लाख करक वंशीय आजही दक्षिण कोरिया मध्ये राहतात. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती Kim Dae-Jung आणि माजी प्रधानमंत्री KimJong-Pil हे सुद्धा स्वताला करक वंशीय मानतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोरियन नागरिक अयोध्येस भेट देतात आणि आपल्या २००० वर्षापूर्वीच्या राजमातेच स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात.
![]() |
| कोरियन राष्ट्रपती मून जे इन यांच्या पत्नी किम जुंग सुक यांची अयोध्या भेट |
प्राचीन काळी दक्षिण आशियात भारतीय संस्कृतीचा खूप प्रभाव होता. इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया, थायलंड, नेपाळ या सारख्या अनेक देशात आजही प्रभू श्रीराम पुजले जातात. बऱ्याच देशात आता हिंदू अल्पसंख्यांक असले तरी ते देश हिंदुत्वाशी असलेली नाळ जोडून आहेत. त्यांची राष्ट्रीय प्रतिक, स्मारक यामधून आपल्याला ते सातत्याने दिसून येत.
मात्र जिथे दक्षिण आशियातून विविध देशाचे लोक आवर्जून भेटायला येतात त्या अयोध्येत प्रभू श्री रामांच साध मंदिर ही नाही. आजही प्रभू श्री राम एका तंबूत विराजमान आहेत हे निश्चितच भूषणावह नाही. अशा परिस्थितीत प्रभू श्रीरामांना पाहिल्यावर जे परदेशी नागरिक अयोध्येस भेट देण्यास येतात त्यांच्या मनात भारताबद्दल काय प्रतिमा तयार होत असेल? कोर्टाच्या आदेशानुषर अयोध्येत आता राम मंदिर निर्माण होणार असल तरी त्याबरोबरच अयोध्येस धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास दक्षिण आशियातील देशांसोबत सौदार्हपूर्ण संबंध वाढवण्यास ते निश्चितच पूरक ठरेल आणि भारत-दक्षिण कोरियाच्या नात्यात एक नवा अध्याय जोडला जाईल.
संदर्भ :
- edtimes
- livehistoryindia.com
- swarajyamag.in
- indiatoday.in



खूप छान माहिती!
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!!
हटवामस्त माहिती अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आजच्या पिढीला माहीत नाहीयेत धन्यवाद आपण माहिती करून देतात
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर मी ही आजच्या पिढीचाच एक तरुण आहे, आपला गौरवपूर्ण इतिहास आपल्या शिक्षण पद्धतीमुळे आपल्यासमोर येतंच नाही, हा इतिहास सर्वांसमोर यावा यासाठीच मी हा ब्लॉग चालू केला आहे...
हटवाचांगली माहिती आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!!
हटवामाझ्यासाठी नवीन आणि महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद 🚩🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद..!!!
हटवाGot to know our history. Learnt something that remained untold.
उत्तर द्याहटवाThank you so much Kandita...!!
हटवाखरंच नवीनच माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!! 🙏😊
हटवारामायणाला एक कपोलकल्पित कथा म्हणणाऱ्यांना ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत.
उत्तर द्याहटवालवकरच निर्माण होणारे राममंदिर या आपल्या पाहुण्यांचे थाटात स्वागत करेल.
धन्यवाद अशी छान माहिती देत आहात त्याबद्दल 🙏