मुख्य सामग्रीवर वगळा

विक्रमशीला विद्यापीठ

विक्रमशीला विद्यापीठाची स्थापना ८ व्या शतकात पाल साम्राज्याने केली. आज विक्रमशीला विद्यापीठाबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे आणि बऱ्याच लोकांना तर माहिती ही नाही की या नावाचे जागतिक किर्तीचे विद्यापीठ आपल्या भारतात होऊन गेले.


नालंदा विद्यापीठाप्रमाणे येथे ही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असतं. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्याने विक्रमशीला विहाराची स्थापना केली.

या विहाराची पुढे प्रसिद्धी ‘विक्रमशीला विद्यापीठा’त परिणती झाली. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव "विक्रमशीला" ठेवण्यात आले. पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने १९६० ते ६९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अँटिकच येथे उत्खनन केले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. सुमारे १०० एकर परिसरात सापडलेले भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात.


विक्रमशीला विद्यापीठाची रचना -

धर्मपाल राजाने महाविहार बांधून बौद्ध धर्मांच्या ४ प्रमुख पंथांचे प्रत्येकी २७ असे १०८ अध्यापक चार विभागांत नेमले आणि महाविहारास देणग्या दिल्या. नंतरच्या पाल राजांनीही विद्यापीठास उदारपणाने आर्थिक साहाय्य केले. इतर धनिकांनीही त्यास देणग्या दिल्या.

महाविहारासभोवती तटबंदी असून चार दिशांना महाद्वारे होती. प्रत्येक प्रवेशद्वारावर एक प्रवेशपरिक्षागृह होते. या प्रवेशद्वारावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच आत प्रवेश दिला जाई.
राजा देवपाल याने आणखी दोन प्रवेशपरीक्षागृहे बांधली. या प्रत्येक द्वारावर विद्वान पंडिताची नेमणूक केलेली होती. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे यांपैकी काही विद्वान पंडित होते.


हे सहा विहारांचे प्रमुख आचार्य होते. विहाराच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालय व अन्य १०८ देवालये होती.

केंद्रस्थानी असलेल्या विहारास ‘विज्ञानगृह’ म्हणत. याशिवाय येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख अतीश दीपंकराचे चित्र होते. 


विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे. विद्यापीठात परदेशांतून तसेच भारतातील विविध भागांतून अध्ययनासाठी विद्यार्थी येत. द्वारस्थ आचार्यांकडून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळत असे. 

तिबेटी भिक्षू येथे अध्ययन करून संस्कृत ग्रंथांचा तिबेटी भाषेत अनुवाद करीत. विद्यापीठीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांस पंडीत, महापंडित इ. पदव्या राजदरबारात देण्यात येत व अशा पंडितांना 'राजपंडित' हे बिरूद मिळे.
अशा प्रख्यात राजपंडितांमध्ये आचार्य रत्नकीर्ती, जेतारी, ज्ञानश्रीमित्र, अतीश दीपंकर, रत्नवज्र, वागीश्वरकीर्ती इत्यादींचा अंतर्भाव होता. येथील ग्रंथालय समृद्ध होते. बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय, वेद, अध्यात्मविद्या, व्याकरण, न्यायशास्त्र इ. विषयांचे येथे अध्यापन होई. 

विद्यापीठाचे प्रशासन महाधिपतींकडे असून त्यांच्या मदतीला सहा आचार्यांचे मंडळ असे. काही काळ नालंदा विद्यापीठाचा कारभारही या मंडळाच्या नियंत्रणाखाली होता. तेथील प्रशासन उत्कृष्ट होते. ह्यूएनत्संग (सु. ६०२-६६४) व इत्सिंग (सू. ६३४−७१३) ह्या चिनी प्रवाशांच्या वृत्तांतून या विद्यापीठाचे कार्य व प्रगती यांबाबत माहिती मिळते. 


खिलजी घराण्यातील महम्मद बिन बख्तियार याने बाराव्या शतकाच्या अखेरीस बिहारवर स्वाऱ्या केल्या, पाल राजा गोविंद याचा पराभव करून त्याची राजधानी ओदंतपुरी ही जिंकून घेतली. अनेक मंदिरे बाटवली.
महम्मद खिलजीने इ.स. ११९३ मध्ये विक्रमशिला विहाराभोवतालच्या ९ फूट उंचीच्या भिंती बख्तियारला किल्ल्याचा तट वाटल्यामुळे त्यावर हल्ला केला असा एक मतप्रवाह इतिहासकारांमध्ये आहे. परंतु तसे असते तर त्याने संपूर्ण ग्रंथालय जाळले व तेथील ब्राह्मणांना आणि भिक्षूंना कंठस्नान नसते घातले.

संदर्भ :
  • Altekar, A. S. Education in Ancient India, Banaras, 1934.
  • Majumdar, R. C. Ed. The Age of Impertal Kanauj, Bombay, 1964.
  • Mookerji, Radha Kumud, Ancient Indian Education, Delhi, 1960.
  • Rawat, P. L. History of Indian Education, Agra, 1968.
  • Vikaspedia

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

10 good habits that world should learn from INDIA

Here are 10 good habits that world should learn from INDIA to avoid epidemics like Corona. 1) Say YES to Namaste & NO to shake hands. Reason - As study shows viruses like bacterias can be transferred from one to another by shaking hands. Namaste is safest way to greet people. 2) Drinking water from bottles without allowing lips to touch the mouth of bottle. Reason - It reduces probability of transmission of inectious agents through saliva. 3) Practise of taking shower after attending the funeral. Reason - The dead oerson may have some infectious disease which can be transmitted so it makes sense. 4) Washing hands before eating. Reason - Your hands are touching everywhere so bacterias on your hands may cause you illness. Washing your hands before eating can rinse away most of the bacteria. 5) Removing shoes outside the main gate of house. Reason - Shoes have large number of bacteria on bottom of the shoes. So it makes sense ...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....