मुख्य सामग्रीवर वगळा

सनातन धर्माला नवसंजीवनी देणारा - पुष्यमित्र शुंग

    प्राचीन भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे कि, प्रत्येक कालखंडात आपल्याला अनेक शूरवीर योद्धे पाहावयास मिळतात. अनेक शूरवीर काळाच्या ओघात विस्मृतीतही गेले. त्यातीलच एक म्हणजे शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती पुष्यमित्र शुंग.... 


    मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु. १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. तत्पूर्वी आचार्य चाणक्य यांच्या निधनानंतर अखंड हिदुस्तानाची त्यांची कल्पना क्षीण झाली होती. चंद्रगुप्त मौर्याने ही जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार गादीवर येताच त्याने राज्याच्या सीमा दक्षिणेपर्यंत वाढवल्या. या पराक्रमी राजाच्या काळात मौर्य साम्राज्याने अनेक राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर गादीवर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक आला. पराक्रमी असणाऱ्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सुमारे २० वर्ष सम्राट अशोकाने राज्य केले. 

    ज्या भारतभूमीत जग जिंकायला निघालेला ग्रीकचा अलेक्झांडर ही पराभूत झाला तिथले शूरवीर मौर्य साम्राज्याच्या पराकोटीच्या अहिंसेमुळे लढण्याची क्षमताच गमावून बसले होते. यामुळे मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यंत निर्बल बनले. मौर्य वंशाच्या या उतरत्या काळात डीमीट्रिअस या ग्रीक राजाने उत्तर भारतावर स्वारी करून अयोध्या, मथुरा व पांचाल हे प्रदेश पादाक्रांत करत थेट पाटलीपुत्रापर्यंत धडक मारली.

    पुष्यमित्राला त्याच्या गुप्तचरांकरवी माहिती कि, ग्रीक सैन्य बौद्ध भिक्षूंच्या रूपात वेषांतर करून मठात लपून बसले आहेत, त्याने राजा बृहदरथ कडे मठांची झडती घेण्याची परवानगी मागितली. मात्र राजा बृहदरथने यास साफ नकार दिला.तरीही पुष्यमित्राने मठात सैन्य घुसवले आणि त्याचे व वेषांतर केलेल्या ग्रीक सैन्याचे युद्ध झाले. यावर चिडलेल्या  राजा बृहदरथने पुष्यमित्राशी युद्ध छेडले मात्र यात राजा बृहदरथ धारातीर्थी पडला आणि सेना पुष्यमित्राच्या बाजूने असल्याने आपसूकच पुष्यमित्र सम्राट बनला.

 पुष्यमित्र सम्राट बनताच त्याने वैदिक सनातन धर्मास नवसंजीवनी दिली.

पुष्यमित्र शुंगाचे शिल्प 

    शेवटच्या मौर्य राजांच्या कारकीर्दीत मगध राज्याचा विस्तार होण्याऐवजी संकोच झाला होता पण सेनापती पुष्यमित्राने सूत्रे हातात घेताच आपली सत्ता दूरवर पसरविली. मध्य भारतातील विदिशा येथे त्याचा पुत्र अग्निमित्र प्रांताधिपती म्हणून राज्य करत होता. पुष्यमित्राच्या सहाव्या वंशजाचा लेख अयोध्येस सापडला आहे. दिव्यावदान  ग्रंथावरून त्याचा अंमल पंजाबात जालंधर आणि सियालकोट पर्यंत पसरला असल्याचे दिसून येते.

    सेनापती पुष्यमित्राने २ अश्वमेघ यज्ञ केल्याचा उल्लेख अयोध्येच्या लेखात आहे. मात्र तरीही त्याने आपली सेनापती’ ही पदवी बदलली नाही. संत कालिदासांचे मालविकाग्निमित्र  नाटक तत्कालीन घटनांवर आधारलेले आहे. त्यातही पुष्यमित्राचा उल्लेख सेनापती पुष्यमित्र असाच केल्याचा आपल्याला आढळून येतो. तत्कालीन पुराव्यांच्या आधारे त्याने ३६ वर्ष शासन केल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

    पुष्यमित्राच्या कालखंडात वैदिक धर्म आणि संस्कृत भाषेला नवसंजीवनी मिळाली. त्याने अशोकाचे हिंसाविरोधी निर्बंध बदलून वैदिक यज्ञ यागास परवानगी दिली आणि स्वतःही अश्वमेघा सारखे यज्ञ केले. पतंजलीच्या महाभाष्य  "इदं पुष्यमित्रं याजयामः|: असे उदाहरण आले आहे. त्यावरून त्याच्या यज्ञांत पतंजलीने स्वतः ऋत्विजाचे काम केले होते, असा अनुमान काढता येतो.

    पुष्यमित्राने बौद्धांचा छळ केला, असाही एक मतप्रवाह आहे. पुष्यमित्राने पाटलीपुत्रातील कुक्कुटाराम नामक बौद्ध विहार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, अनेक बौद्ध विहार उद्ध्वस्त करून बौद्ध भिक्षूंची कत्तल केली होती. तर काही बौद्धांनी ग्रीकांना छुपी मदत केली म्हणून पुष्यमित्राने बौद्धांना दंडीत केल्याचं ही आपणास ऐकावया मिळते. मात्र या दंतकथांना समकालीन पुरावे आजमितीस उपलब्ध नाहीत. 

    मात्र काही डाव्या सेक्युलर लोकांनी पुष्यमित्र ला खलनायक दाखवायचा प्रयत्न केला. कोणत्याही सबळ पुराव्यांअभावी त्याला कट्टर सनातनी दाखवत, बौद्ध धर्मद्वेषी असल्याचे दाखवले गेले.

सांची स्तूप, मध्यप्रदेश 

    मात्र भारहुत आणि सांची येथील तत्कालीन बांधलेल्या स्तूप आपल्याला वेगळीच कहाणी सांगतात. भारहुत येथील तोरणावर तर ":सुंगानं रजे|" म्हणजेच शुंगांच्या राज्यात असा स्पष्ट उल्लेख आहे. याचाच अर्थ पुष्यमित्र स्वधर्माभिमानी असला तरी इतर धर्मांचा द्वेष करत नव्हता असाच होतो.

संदर्भ : The Age of Imperial Unity, OpIndia 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खाद्य तेलांच्या किंमती का वाढत आहेत?

गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल .. पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत. परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत. याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~ जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील. यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे. Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील. किंमती का वाढल्या? आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो. पाम तेल - जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो. मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्य

अघोरी साधु आणि नागा साधु

कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा... परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक... अघोरी साधू  अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो. तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात. शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे

साठमारी डागदारी

नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे?? तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे... पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी .. अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या  साठमारी डागदारी  चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी  साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती. या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्यापैकी प्रत्येक माणसास ‘ साठमार