मुख्य सामग्रीवर वगळा

खाद्य तेलांच्या किंमती का वाढत आहेत?

गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल..

पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत. परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत. याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~

जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील. यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे.

Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील.
Money bag किंमती का वाढल्या?
आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो.

Rightwards arrow पाम तेल -
जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो. मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्यास सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे तिथले ही पाम तेलाचे उत्पादन कमी झाले आहे.
चीन कोरोनातुन सावरत असल्याने चीनची तेलाची मागणी देखील वाढली आहे. गेल्या सहा महिन्यात चीनने पाम तेलाची आयात ३१% वाढवली आहे. जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी २१ मध्ये चीनचे खाद्यतेलाची मागणी ४८% वाढली आहे. उत्पादन कमी असताना चीनने आयात वाढवल्याने त्याचा प्रभाव तेलाच्या किंमतीवरही पडला.


Rightwards arrow सोयाबीन तेल -
जगभरात ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन प्रमुख देश आहेत जे सोयाबीनचे प्रमुख उत्पादक आहेत. मात्र तिथल्या दुष्काळामुळे आणि कोरोनामुळे गेल्या १० वर्षात सोयाबीनचे सर्वात कमी उत्पादन आले.


 
Rightwards arrow सूर्यफुल तेल -
रशिया आणि युक्रेन सूर्यफुलाच्या बियांचे मुख्य निर्यातदार आहेत. भारतही यांच्याकडूनच खरेदी करत असतो. मात्र या दोन्ही देशात मिळून सूर्य फुलाच्या बियांचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ३० लाख टन कमी झाले आहे. ज्यामुळे यांच्या किंमती ही वाढल्या.

भारत जवळपास सुमारे ६५% तेल इतर देशांमधून आयात करतो. त्यामुळे जगाच्या पाठीवर घडलेल्या गोष्टींचा प्रभाव भारतावर पडणे निश्चित आहे. भारतात खूप आधीपासून खाद्य तेलांवर आयात कर वसूल गेला जातो. पाम तेलावर तो ३७.५% होता. नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने त्यात १० टक्के कपात करून २७.५% केला.

मात्र ज्या देशांमधून आपण आयात करतो तिथे किंमत वाढल्याने हा आपल्याला हा बदल दिसून नाही आला. याव्यतिरिक्त पाम तेलावर १७.५% तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावर २०% कृषी सेस आकारला जातो. मात्र सरकार हा कृषी सेस देखील कमी करण्याच्या विचारात आहे. येत्या महिनाभरात सरकारने आयात केलेलं खाद्यतेल बाजारात येईल, तेव्हा तेलाच्या किंमती निश्चितच कमी होतील.

माहिती नसताना उगाच केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा आधी माहिती घेत चला...

क्यूँ की पढेगा इंडिया, तभी तो आगे बढेगा इंडिया...!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अघोरी साधु आणि नागा साधु

कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा... परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक... अघोरी साधू  अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो. तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात. शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे

साठमारी डागदारी

नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे?? तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे... पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी .. अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या  साठमारी डागदारी  चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी  साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती. या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्यापैकी प्रत्येक माणसास ‘ साठमार